“
गुंतणे हे नेहमीच वेगळे असते प्रत्येकाचे. . नात्यातील गुंता तर असह्य करतो प्रत्येकाला. . सोडावे लागले तर पश्चात्ताप आणि गुंतून बसलो तर पुढे जाणे अशक्य. . अशा वेळी मग वेळच द्यावा वेळेला. . तुझे सगळे पर्याय होऊ देत आजमावून. . मग जे समोर येईल घेऊ, अशी खूणगाठ बांधावी म्हणजे घालमेल कमी होते. .!!!
”