Gouri Santosh
Literary Captain
22
Posts
0
Followers
0
Following

None

Share with friends

मैत्री ही जशी रक्तसंबंधाने मिळत नाही तशी रोजच्या समोर असण्याने ही घट्ट बांधली जात नाही. . एकमेकांशी एकरूप होण्याचा पहिला धडा येथेच मिळतो आणि आयुष्यातले अनेक निर्णय येथेच फायनल होतात. . फक्त गरज असते ती वैयक्तिक व्याप, पद, पैसा, प्रतिष्ठा यांचं गाठोडं बांधून मनाच्या तळाशी सोडून द्यायचे आणि मैत्रीच्या सहवासात मनमुराद जगण्याची. म्हणजे मग तळाशी सोडून दिलेलं गाठोडं अलगद सोडवायला एक निष्पाप जागा मिळते.

गुंतणे हे नेहमीच वेगळे असते प्रत्येकाचे. . नात्यातील गुंता तर असह्य करतो प्रत्येकाला. . सोडावे लागले तर पश्चात्ताप आणि गुंतून बसलो तर पुढे जाणे अशक्य. . अशा वेळी मग वेळच द्यावा वेळेला. . तुझे सगळे पर्याय होऊ देत आजमावून. . मग जे समोर येईल घेऊ, अशी खूणगाठ बांधावी म्हणजे घालमेल कमी होते. .!!!


Feed

Library

Write

Notification
Profile