नियतीनं आज पहा डाव कसा हा मांडला।
दहशतवादाच्या सामन्यांत प्राण त्याचा सांडला।।
वाटलं सार्यांना तिला पाहून धीर ना तिनं सोडला।
एकांतातच तिनं मात्र मूकपणे टाहो होता फोडला।।
प्रेमात दुबळा होतास राजा, तू तर आत्महत्या केली ।
तिनं संयम पाळला नि जितेपणीच मरणयातना सोसली।।
पुस्तकाची काही पानं मी कधीच नाही चाळली,
वाचनाची शिस्त मी अनेकदा नाही पाळली ।
आज वाटत बरं केलं मी ती पानं गाळली ,
जितकी वाचली ती आजही नाही कळली ।।
आहेस माझ्या सुखात तू भागीदार।
असशील का दु:खातील साथीदार???
दु:खात लाभलं प्रेम तर वाटतं कुणी आहे आपलंसं।
प्रेमात दु:ख आलं कि कळतं कुणीच नाही आपलंसं।।
चंद्राच्या चांदण्यात आज गुलमोहर फुलला
तुझ्या ह्या सौंदर्याला चंद्रमाही भुलला।।
स्वातंत्र्यात आहेस तू, सोडू नकोस सदाचार।
कर्तव्याची जाण असावी, नसावा स्वैराचार।।
लेखकाच्या लेखणीने सदैव असावे सावधान,
बोचरे असले लिखाण तरी पाळावे समाजभान।
मातृत्वाचं कौतुक होतं
पितृत्वाला सारेच विसरतात।
मातेच्या भावना दिसतात पण
पित्याच्या त्या घामात भिजतात।।