नको खचू अपयशाने
कर कष्ट अपार,
झुंज दे सागराशी
हो लाटांवर स्वार.
प्रारंभ नवरात्रोत्सवाचा
होई मंगलमय वातावरण
माझ्या भक्तीची कमलपुष्प,
आई तुझ्या चरणी अर्पण.
नको तो दिखावू बडेजाव,
अन् त्यासाठी कर्जाचा डोंगर,
नको ती उसनी पंचपक्वान्ने,
मला प्रिय माझी कष्टाची भाकर.
प्रिय मित्राला खूप वर्षांनी भेटल्यानंतर एखादा खजिना सापडल्याप्रमाणे आनंद होतो. जणू आपल्या रुक्ष जीवनात सुखाच्या श्रावणसरी बरसून जातो.
निसर्गाची मोहक रूपे
या मनास खुणावतात ,
कवीमनात सुरेख
काव्यपुष्प उमलतात.
पूर्व क्षितिजावर कोणी हे गुलाल उधळले लक्ष लक्ष सोनेरी दूतांसह सूर्यदेव अवतरले.
जिंदगी गुजर जाये इतना तो पास होता है,
फिर भी और पाने की प्यास होती है|
जेव्हा नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळ्यापेक्षा अपेक्षांचे ओझे जास्त होते तेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आपला खरा मित्र.