मला कथा कविता, चारोळी, शायरी, quates लिहायला आणि वाचायला आवडतात.
Share with friendsशब्द पुष्प 💐 मुक्या प्राण्यास वाटे माणूस व्हावे शुद्ध आचरण वाणीतून वदवावे माणसास ते ना कधी उमगते माझे माझे म्हणूनी जीवन निघून जाते अक्षरपंख मनिषा बोटे
💐💐💐💐 _*पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते.
"किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते..म्हणून आनंदी रहावं...आपण कितीही आपल्या बुध्दीनुसार , शक्तीनुसार जीवन जगत असलो, तरीही..नियतीने मांडलेला डाव आणि ठरविलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो...आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग, मृत्यू येणं हा काळाचा भाग, तर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे...
*_मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचे नाही; मनात आणि घरात "आपलेपणा" किती आहे हे महत्त्वाचे असतं..._* _*खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील?*_ _*विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वत: साठी नसते समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही. सुर्य स्वतःसाठी सृष्टीच पोषण करत नाही. आपणाला पण इतरांसाठी जगले पाहिचे.
*जीवनातील प्रत्येक ठोकर ही केवळ पडण्यासाठीच लागते असे नाही तर काही ठोकर ही सांभाळण्यासाठी, समजण्यासाठी किंवा शिकण्यासाठी देखील लागतात.
💐💐💐💐💐 _*स्वतःच्या सर्व सुखांची तडजोड करून, वेळ प्रसंगी देशासाठी संघर्ष करून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालावा लागतो, त्यानंतरच येणाऱ्या पुढच्या पिढीला स्थैर्य आणि सुख समृद्धी मिळते...*_
*जगातील सर्वात भाग्यवान माणुस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भुक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे.* ©®अक्षरपंख मनिषा