None
Share with friends१)आवडणारी माणसं हृदयात .. आणि नावडणारी.. डोक्यात जातात. २) आयुष्यात आपलीच प्रतिरूपं आपणास सापडली की, आयुष्य जादुमयी वाटतं, ३)आनंदी मन म्हणजे कुबेराचा खजानाचं ! ४)जे विचारी असतात तेच विचारांवर विचार करतात. ५)अपेक्षा तिथेच ठेवा, जिथे ती पूर्ण होण्याची खात्री असते.
१)"शब्द तेच असतात.... फक्त माणसांच्या नजरेनुसार त्यांचे अर्थ बदलतात." २)सगळेच "बी" रुजणारे नसतात. ३) आयष्यात जेव्हा*हतबलता*निर्माण होते,तेव्हा शहाणी माणसं फक्त शांत बसतात.आणि मुर्ख माणसं...., उगाचंच चिडचिड करून स्वत:चंच मानसिक स्वास्थ्य हरवून बसतात. ४)किंमत माणसाला नसतेचं.... तो उभा असलेल्या जागेला असते.... ५)संवाद हा दोन समजूतदार मनांमध्येच होऊ शकतो. ६)ओढ म्हणजे.... नात्यातील जीवंतपणाच!...