अपयशाच्या या नगरीत
आशेची घरे वसलेली
निराशमय मनाला
पुस्तकांची साथ लाभली
आठवणी ह्या मनाशी नेहमीच ऊन सावलीप्रमाणे लपंडाव खेळतात, ऐन उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक यावी तसे चोरपावलांनी येऊन जातात
निघून जाणार अत्तर काय कामाचं
माणसाला आलेल्या अडचणी त्याच्यातील क्षमतेची जाणीव करून देतात
जोपर्यंत मनाला ध्येयाचे वेड आहे
अंतःकरणात जिद्द आहे
क्षितिजापलीकडे पाहण्याचा ध्यास आहे
डोळयांसमोर खुले आकाश आहे
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे