सर येता वळवाची गंधाळली माती फुलला अंकुर नवा मोहरली नाती कस्तुरीचा गंध राणीवनी पसरला झाडाझुडुपांआड अवचित मोरपिसारा बहरला...
भार वाहतो उगा उदयाचा जरी भरवसा नसे क्षणाचा आशेवरती दुनिया कायम इथें विसावा नसे कुणाचा...
आळवीले तें सूर पुन्हां छेडील्या मनीच्या तारा गात विराणी उदास भासे आज कसा हा वारा...
माळलास जेंव्हा केसांत तू गजरा गंधाने त्याच्या मोहरले स्वप्न आलें हे बहरा....
चोरपावले चोरले मन चित्त माझें लागेना हरवूनी बसले मीचं मला मग काय झाले समजेना
ठिबकणाऱ्या रक्तातूनही येतो तुझ्या स्मृतींचा गंध किती आवळले मना तरी पाखरू हे स्वैर बेबंध
जन्म मरण नको काही नको भोग प्राप्तनाचे स्वार्थाच्या परिघाबाहेर सुखं भेटेल शाश्वताचे
आयुष्याच्या रंगपटाची मी एक सोंगटी अवतीभवती असून सारें मी अशीं एकटी
विरहात तुझ्या दिनरात मी जळते नाही म्हंटलं तरी आठवणीत तळमळते तुझ्यापासून दूर जाताना काही तरी तुटतं होते गहिवरल्या मनाचे बांध सारें फुटतं होते...