या जगात मोठं होण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावं लागतं.
षड्रिपूवर जो विजय मिळवतो तोच खरा महात्मा असतो.
एखाद्यानं आपल्याला स्वीकारणं किंवा नाकारणं हे ज्याच्या त्याच्या सोयीचा भाग असतो.
एखाद्याच्या बोलण्याला आपण कसा प्रतिसाद देतो यावर आपल्या विचारांची उंची अवलंबून असते.
आपल्याविषयी कोण,कधी,कोठे,काय बोलतो यापेक्षा त्याला आपण कसे स्वीकारतो हे जास्त महत्त्वाचे.
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले की,ती गोष्ट चांगलीच दिसते.
खरं बोलायला माणसांत हिंमत लागते.
प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी व्यक्तीच आयुष्यात खरी सुखी असते.
संयम हाच मानवाचा खरा गुरू आहे.