I'm harshada and I love to read StoryMirror contents.
Share with friends
अहंकार दुःखाजवळ फिरकत नाही. सुखामुळे अहंकाराचा जन्म होतो. मग ते सुख कोणतेही असो विद्वत्ता,पैसा ,सत्ता व प्रतिष्ठा....
ज्ञानाच्या ही काही अवस्था असतात. ज्ञान जेव्हा बाल्यावस्थेत असते तेव्हा ते हट्टी आणि आग्रही असते, ज्ञान जेव्हा युवावस्थेत येते तेव्हा धैर्य आणि सामर्थ्यवान बनते तर ज्ञान जेव्हा वृद्धावस्थेकडे प्रवास करत असते तेव्हा करुणभाव, प्रेम,भक्तिरस आपल्यात झिरपत जातो... आणि या ज्ञानाची अंतिम अवस्था म्हणजे चिरशांती नि मुक्तियोग...