I'm Namita Dhiraj and I love to read StoryMirror contents.
Share with friendsकधी कधी चुक नसताना देखील माफी मागावी लागते. कारण नात्यांची अलवार जपवणूक करणे आपल्या संस्कारांत असते..
आयुष्य फुलपाखरासारखे असावे, त्याला कुणाचे बंध नसावे.. रंगीबेरंगी फुलांवर बागडणारे असावे, सगळ्यांच्या डोळ्यांना आनंद देणारे असावे..
दोन जीवांना जोडणारा, रेशीम धागा म्हणजे प्रेम.. हळव्या प्रितीच्या गाठींना, मनाचे बंध बांधुनी.. विश्वासाच्या कोरीव नक्षीदारपणांना, अखंड सुबक ठेवणारा..
आपल्या विचारांची ताकद इतकी प्रबळ असते की, स्वप्नांना देखील इच्छा शक्तीचे पंख लागतात उडण्या साठी.. ©®नमिता धिरज तांडेल..
मैत्री म्हणजे वर्षानुवर्ष पुस्तकात जपून ठेवलेल्या जाळीदार आठवणीच्या पिंपळ पाना सारखी असते.. ©®नमिता धिरज तांडेल
लहानपणी खेळणी खेळताना खेळण्याशी किती तरी दिलखुलास गोष्टी करून जायचे.. मन रमवणारी खेळणी जरी अबोल असली तरी बालपणीचे पहिले सोबती होते.. ©®नमिता धिरज तांडेल..
देव आपल्याला दिसत नसला. तरी आपला त्याच्या वर विश्वास आहे. म्हणूनच देवाने धरती वर पाठवलेले देवदूत म्हणजे डॉक्टर.. ©®नमिता धिरज तांडेल
डोळ्यांना ह्रुदया बद्दल किती सहानभूती असते. दुःखाचे अश्रूत रूपांतर व्हायला जरा देखील वेळ लागत नाही. ©®नमिता धिरज तांडेल