खूप झालं आता हे थांबायला हवं
खूप झालं आता हे थांबायला हवं
हैद्राबाद, दिल्ली, हिंगणघाट
हृदयद्रावक घटनांची मालिका
का असे वारंवार घडते आहे?
तरुण का इतका बिघडतो आहे?
संस्कारांचा अभाव कि मोबाइल संस्कृती?
कायद्याची दिरंगाई कि संपलेली माणुसकी?
खूप झालं आता हे थांबायला हवेच मित्रानो
असल्या नराधमांना त्वरित फाशी द्यायालाच हवी
सर्व प्रश्न कायद्याने सुटत नसतात
मुलींनि स्वरक्षण करण्यास सक्षम व्हावं
प्रेमात होकार, नकार पचवता यावा हेही खरंय
प्रेम म्हणजे त्याग, समर्पण नसे वासनांध मिलाफ
मुला - मुलींचंही समुपदेशन आवश्यक असत ....
पालकांनी अशावेळी खंबीर मित्रासारख रिऍक्ट व्हावं
पुन्हा असले एकतर्फी प्रेमाचे बळी जाऊच नये असं वाटत
लेखक, पत्रकार, पालक, समाज, सरकारनं पुढाकार घ्यावा