कधी कळलंच नाही ग तुला ?
कधी कळलंच नाही ग तुला ?
तू दिलेलं दुःख ,वेदना ,आजही साहतो मी...
किती छळशील मला ,तेच पाहतो मी ...
जीवघेणी घालमेल , ती असहाय्यता
तरीही अढळ ,निश्चल राहतो मी ....
खरंच सख्ये ! तुझ्यासवे घालवलेला ...
प्रत्येक क्षण नव्याने अनुभवतो मी
तू भलेही विसरलीस असशील मला...
तू न मागताही सारं आयुष्यच दिल होतं तुला
तुला माझी किंमत ना, दिल्या - घेतल्या वचनांची ...
मी मात्र जळत राहिलो , तुला दिलेले वचन पळत राहिलो
तू ठरलीस ग पक्की व्यवहारवादी म्हणून यशस्वी ...
मी मात्र ठरलो भावुक , हळवा, ठारवेडा या व्यवहारी जगात
कधी कळलंच नाही ग तुला ? मी अन माझं प्रेम
प्रेम हे देऊळ असतं ,खडतर गिर्यारोहण असतं ...
प्रेम म्हणजे त्याग , समर्पण, जीवदायी ,कुटुंबवत्सल
प्रेम असतं मनभावन , प्रेम असतं दीवानापण ...