एक वल्ली
एक वल्ली
वल्ली भेटला मला
म्हणाला
तुम्ही असे का लिहीत नाही
तुम्ही तसे का लिहीत नाही
तुम्ही असे का लिहिता
तुम्ही तसे का लिहिता
म्हटले,
याला नेमके म्हणायचे आहे तरी काय?
थोडे थांबून तोच म्हणाला
लिखाण कसं आतडं पिळवटणार पाहिजे
आतडी बाहेर काढणारं पाहिजे
धारदार पाहिजे, अर्थपूर्ण पाहिजे
टचकन टोचणार, बोचणार पाहिजे
खसकन खुपणार पाहिजे
समजलं मला
म्हटलं
वेदना मी पहात नाही
वेदना मला दिसत नाही
वेदनेचं जीणं मी जगत नाही
वेदनेच जीणं जगवत नाही
बाबा रे
दृष्टी तशी सृष्टी
तू ही तसंच कर
जग सुंदर आहे
बंदर होऊन जगण्यात काय अर्थ आहे...?
म्हटलं एवढंच कर
मी चांगला
तर जग चांगलं समज
जीवनात वाईट असं काही दिसणार नाही
जीवनात वाईट असं काही असणार नाही
वाईट असं काही घडणार नाही
वाईट असं काही होणार नाही
बहुतेक त्याला पटलं
तो इतकंच म्हणाला,
सर तुमच्या कविता, लिखाण
मला खूप आवडतं
बरं वाटलं
म्हटलं साधं सोपं जीण असावं
त्यात दुःखाला स्थान नसावं
जणू सौख्य समाधान शांतीचं
ते अनमोल आंदण असावं....!