महत्त्व स्वच्छतेचे
महत्त्व स्वच्छतेचे
सुंदरबनात एकदा भरली
सभा सगळ्या प्राण्यांची
विषय फारच गंभीर होता
झाली होती टंचाई पाण्याची
मनसोक्त डुंबायला हत्तीदादाला
मिळत नव्हते पाणी
तहान भागेना पिलांची म्हणून
वैतागली होती जंगलाची राणी
सगळेच प्राणी त्रासले होते
वारंवारच्या या पाणीटंचाईला
जमले होते म्हणूनच सगळे
उपाय यावर शोधण्याला
सिंहमहाराजांनी सुचवला
उपाय हा नामी
करु सफाई तळ्याची
पाणी पडणार नाही कमी
सर्वांना पटला हा उपाय
कामांची केली प्रत्येकाने वाटणी
तळयातला गाळ केला साफ
धो- धो पावसाने साठले भरपूर पाणी
चिंता मिटली पाण्याची म्हणून
सगळेच गेले आनंदून
सगळ्यांनाच समजले होते आता
सफाईमुळे झाले संकट दूर
सिंहमहाराज म्हणाले सर्वांना
सफाईमुळे दुर झाली पाणीटंचाई
आता आपल्याला पाण्यासाठी
माणसाच्या वस्तीत जावे लागणार नाही