मंदी
मंदी
मंदी आली मंदी आली
नारा सर्वांनी लावला...
चार महिन्यांचा पावसाळा
जा जा म्हटले तरी गेला नाही मुकाटयाने...
पुराने थैमान घातले
होत नव्हत घरातलं पाण्यात गेल...
कंबर कसली परत
शेतात पीक उभ केल...
परत पावसाने थैमान घातल
उभ्या पीकच जमिनदोस्त केल...
पीक विम्याचे पैसे मिळतील
मायबाप सरकारला हात जोडल्यावर...
दुष्काळा मुळे खचलेला खचुन जातो
तर मदतीचा हात समोर करणारा रग्गड बनतो...