समस्येचं हल
समस्येचं हल
निसर्गाचा चालूच राहणार खेळ
माणसालाच घालावा लागणार मेळ
दुष्काळ म्हणजे निसर्गाचा दुष्ट काळ
निसर्गाशीच जोडली सुखाची नाळ
जाणार दुष्काळ येणार सुकाळ
निसर्गाची आपण वाजवणार टाळ
निसर्गचक्राची चालूच राहणार चाल
माणसा जवळ बुध्दी आहे चंचल
पाहीजे तिथे नेऊ शकतो जलजल
कधी निसर्ग तापेल कधी बरसेल
मानवाची लगेच होते घालमेल
सरकारी मदतीची होते रेलचेल
देश,राज्य, शहर,मदतीला येतील
माणसाजवळ आहे समस्येचे हल
आंदोलन, मोर्चे,कर्जमाफी मागतील
प्राणी,पक्षींना मदतीला कोण बरे येईल
निसर्गचक्र करत सुटतं धुमाकूळ
प्रत्येक प्राणी पक्षांना लागते झळ
दिसत नाही कुणाला त्यांची तळमळ
घरटे बांधतांना चालते त्यांची चळवळ
निसर्गाशी नातं त्यांचं पक्क निर्मळ
दुष्काळ समस्ये पासूण काढत नाही पळ
अन्न,पाणी,निवाऱ्यासाठी वाढवतात बळ
निसर्गाशी तडजोड करुण घालता मेळ