आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढे तर
प्रश्नच प्रश्न आहे ..
उत्तर नसलेली प्रश्न ..
प्रश्नाच्या उत्तरातच नवा
प्रश्न करणारी प्रश्न ...
पाणी , विज असो वा
गरिबी नि बेकारी
प्रत्येक प्रश्न ज्वलंत
जळत राहतो शासनदारी
उपाययोजना म्हणून
आश्वासने होतात ...
सर्वसामान्य माणसाची
पिळवणूक करतात
खुर्चीचे राजेचं विकल्या गेले
जाब मागायचा कोणाला ?
लोकशाहीत लोकांचीच
फसवणूक होते
लोकांनी आपलं म्हणायचं कोणाला ?
प्रश्नाच्या उत्तरात माञ
कविता रचल्या जाते...
काही प्रश्न सोडवण्या
लेखणीचे शब्द ही नकळत
मदत करते..!!!!!!!