संदेश
संदेश
घालमेल झाडा - झुडपांची , पशुपक्षाची समजून घेणार का कुणी ?
समतोलही बिघडू न द्यावा निसर्गाचा अन शोधावी गुपिते सर्वानी ...
का खदखदतो लाव्हारस , का होते अस्वस्थ धरा ? का येते त्सुनामी ?
येते आभाळ भरून अन देऊन जाते का हुलकावणी ? वणवा पेटतो मनात...
ऋतुचक्र निसर्गाचे अबाधित राहावे , जीवजंतू ,किट्ककृमी सुखी व्हावे ..
हिरवं स्वप्न बळीराजाचं करपत , होतो धरणीकंप त्याच्या हृदयात नि पाणी गोठत डोळ्यात
आभाळाची अस्वस्थता आणि लाव्हारसाची उद्विग्नता घेऊन तो पेरतो पुन्हा - पुन्हा ..
सुटेल कधी का हे दृष्टचक्र बळीराजाच्या भोवतालचं .. अन होईल का खेडी स्वयंपूर्ण पुन्हा ?
बेसुमार वृक्षतोड नको की ,खनिज संपत्तीची तस्करी नको , नको प्राणी , पक्षांची शिकार
झाडे लावा , झाडे वाढवा , पाणी आडवा , पाणी जिरवा राखण्या समतोल पर्यावरणाचा
ऱ्हास नको नैसर्गिक संपत्तीचा , राखून ठेवूया पुढच्या पिढीस हा अनमोल ठेवा ...
फक्त सांगणे उत्कर्ष होण्या समग्र मानवजातीचा... संदेश एवढा त्यांच्यापर्यंत पोहचावा