आता तरी तू हो रे माणूस...
आता तरी तू हो रे माणूस...
तो देतो भरभरून ... किती घेशील दोन कराने ?
लांड्या - लबाड्या किती करशील ? स्वतःलाही किती फसवशील ...
येशील - जाशील त्याच्या मर्जीने , सोबती तू गाड्या काय नेशील ?
जगून घे ,रे मनासारखे ...मनुष्य जन्म नाहीच नंतर ...
माणसा - माणसा कधी होशील रे तू माणूस ?
येशील - जाशील त्याच्या च मर्जीने ...
आला तसाच जाशीलही तू खाली हात
तुझे इथे काही काळाचं पाहुणंपण ...
जाणून घे रे जीवन हे क्षणभंगुर
माणसा - माणसा कधी होशील रे तू माणूस ?
प्राण्यांमधुनी तूच श्रेष्ठ , बुद्धि सामर्थ्य तुझ्याच ठायीचे
लाव पणास तूच गडे , आनंदभरण्या तिन्ही लोके ....
सावर रे ऋतुचक्र अन पर्यावरणाचं ऱ्हास थांबव गडे
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळू दे ....
माणसा - माणसा आता तरी तू हो रे माणूस
आहेस तोवर किती पळशील , सुखाचे क्षण कधी अनुभवशील ?
जीवन म्हणजे जन्मपासूनचा मरणापर्यंतचा अखंड प्रवास...
राग , लोभ , मोह , माया , यांच्यावरती विजय मिळव रे थोडा
आनंदाचा प्रवास होण्या, खुशाल उधळू दे प्रेमाचा अशवमेध घोडा
माणसा - माणसा आता तरी तू हो रे माणूस...