चारोळी
चारोळी
1 min
6.6K
1.जिंकायचे तर जग होते,
उभे संकटाचे ढग होते.
मी हरलो लढता लढता,
ईथेच शत्रु ही सजग होते.
2.जीवनातील एका चुकीचा,
आयुष्य भर त्रास होतो.
आपल्या आप्त जणांन पासून
आपुलकी चा भास होतो.
3.तुला पडली कशी ही भ्रांत आहे.
घे लुटून आपलाच प्रांत आहे.
कुठ वर जपशील आपले इमान तु?
भुके पुढे फोल सारे सिध्दान्त आहे.