हो ग हल्ली मी तुला टाळतोय..
हो ग हल्ली मी तुला टाळतोय..
हो ग खरंय.. हल्ली मी तुला टाळतोय
कारण ... ज्या गावाला जायचंच नाही
त्या गावचा रस्ता विचारायचाच कशाला ?
झालं गेलं विसरून जा तू ही त्यातच तुझं भलं आहे ..
तसही तू नाहीच होणार माझी ,ठरलेलं...
मग उगाच माझ्यामुळे तुला त्रास कशाला ?
क्षितीज जस आभासी तसंच तर आपलं नातं
मनातलं चांदणं ते त्याला कोण विचारतं ?
कितीही नाही म्हटलं तरी . मार्ग आपुले वेगळे
नकोच हव्यास त्या स्वप्नाचा.. जे कधीच पूर्ण होणार नाही
आभासी मृगजळाने कधी तृष्णा भागत नाही
छेद पडलेल्या नावेला बुडण्यास वेळ लागत नाही
खरंच ग आता तुला वेळीच सावरायला हवं ...
माहित्येय मला ते इतकं सोप्प नाही .तुझ्यासाठी
वास्तव कितीही कटू असलं तरी ते तू स्वीकारायला हवं
प्रेमाची किंमत कधीच कुणाला कळली नाही , कळणारही नाही
माहित्येय ना तुला ? प्रेमाचे संकेतही फारसे कुणी सहसा पाळत नाही
प्रेम हे पवित्र असत हे कुणाला पटत नाही ... जाऊ दे ग नाही तर नाही
जन्मभराची साथ नाहीस दिली पण मैत्री मात्र विसरायची नाही
ऋणानुबंध , प्रेम आपुले जन्म -जन्मतरीचे, अतूट चिरकाल टिकणारे ...