मतदान
मतदान
बोटावरच्या शाईत दडले
भविष्य माझ्या देशाचे
लोकशाही बळकटीसाठी
प्रत्येकाने मतदान करायचे।
योग्य त्याच नेत्याला निवडून
सर्वोच्चपदी द्यायची जागा
करावा लागणार नाही तरच
विकासासाठी नागरीकांना त्रागा।
सगळ्यांच्या योगदानाशिवाय
देश आता नाही तरणार
भ्रष्ट,स्वार्थी नेत्यांना हटवून
निष्कलंक नेता निवडणार।
भारत देशाचा सुजाण नागरीक
भविष्य देशाचे देणार योग्य हाती
पारदर्शक,डिजिटल विकास
काम करेल जो जनतेसाठी