वीर विचार
वीर विचार
जेव्हा केले इंग्रजांनी
भारतावर राज्य
तेव्हा स्वातंत्र्यलढा देण्यास
क्रांतीकारक झाले सज्ज ll १ ll
जेव्हा इंग्रजांनी केला
अन्याय आणि अत्याचार
तेव्हा त्या वीरांनी पसरविला
स्वातंत्र्याचा सद् विचार ll २ ll
वीरांनी केला इंग्रजांशी
स्वातंत्र्य संग्राम
त्या वीरांना माझा
कोटी कोटी प्रणाम ll ३ ll
त्यांचे हे बलिदान
वाया नाही गेले
शेवटी इंग्रजाना
जावेच लागले ll ४ ll
आजच्या काळात वाढत आहे
स्वैराचार आणि भ्रष्टाचार
सारे विसरत आहे
त्या वीरांचे सद् विचार ll ५ ll
प्रत्येकाने सेवा करावी
भारतमाते साठी
प्रत्येकाने घ्यावी हाती
सत्कर्माची लाठी ll ६ ll