घाव
घाव
वर्मी लागला घाव गड्या
सालपटच निघाली टिंबाटिंबाची
हीच रीत आहे इथली
ख्याती जी इथल्या मातीची...
फुलते खुलते
इतिहास घडविते
ताकत दावते मतीची
साऱ्या जगताला...
कोणीच नसते
मातीमधले
त्याच्या साठी कधी
स्वागताला...
पोटशूळ तो
सदैव असतो पोटी
पुढे जाणाऱ्यास
मागे मागे खेचण्याला...
दृष्टी तशी सृष्टी
विसरून जातो
छाती काढून
मी पणा आपला जपण्याला....
जाऊ देत म्हटले
आपलेच दात आणि आपलेच ओठ
लिहावे काहीतरी आता
सरळसोट...
शिकाल तर टिकाल
वाचाल तर वाचाल
हे तरी आता गळी उतरू दे
म्हटले
देवा परमेश्वरा
माझ्या लेखणीची धार
अन अर्थपूर्णता
एकदा तरी
वाचकाच्या पचनी पडू दे...!