वृक्षाशी जोडले नाते
वृक्षाशी जोडले नाते
वृक्षामुळे आपल्या आवतीभोवतीचं वातावरण कसं स्वच्छ, निर्मळ असते. पर्यावरण चांगलं असते. तर आपण पण निरोगी असतो. वृक्षांची काळजी घेणं, स्वतःची जबाबदारी आहे. वृक्षापासून आपल्याला खूप काही मिळतं, वृक्षाविना माणसाचं जीवन नाही. झाडापासून माणसाला खूप काही मिळत आणि मिळत पण राहणार. झाडाचं आणि माणसाचं खूप जवळचं नात आहे आणि ते तसंच राहणार जसं की आई आणि मुलाचं नातं असते तसंच माणसाचं आणि झाडाचं नातं आहे.
झाडापासून हवा, फळे, फुले, लाकूड...खूप काही मिळतं. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे झाडांमुळे जीवन जगायला मिळतं. झाडांमुळे आपल्याला नवीन दिशा मिळते. जीवन जगायला झाडं स्वतःसाठी काहीच करत नाहीत. झाडे दुसऱ्यासाठी पूर्ण जीवन घालतात. माणूस मात्र स्वार्थीपणाने जगतो. खरंच जे झाडापासून मिळतं ते कोणाजवळंच मिळत नाही. जेेव्हा केव्हा मन उदास होते तेेव्हा आपण झाडाखाली जाऊन बसल्याने, मनाला कसं शांत वाटतं, मनातून समाधानपण वाटतं, माझं आणि झाडाचं वेगळंच नात आहे. मला झाडाशी बोलायला खूपखूप आवडतं. माझ्या बालपणापासून असं वाटत की, झाडे माझे दोस्त आहेत. जेव्हा केव्हा, मी परेशान होते तेव्हा मी झाडांशी बोलते, झाडांना माझं सुखंदुःख सांगते. ते माझं मनपण समजून घेतात. प्रत्येक मोडवर, झाडं मला शांती देतात.
जेव्हा मी झाडांच्या थंड सावलीत जाऊन बसते खरंंच मी जेेव्हा झाडाखाली बसते. डोकं झाडाला टेकवते. तेेव्हा मन शांत होते. झाडं मला सोडून कधीच जात नाही. झाडं कधी रागावत नााहीत, माझ्यावर नाराज होत नाहीत. आजकालचे दोस्त जवळ पैसे आहेत तोपर्यंत दोस्ती करतात. बॅलन्स संपला की दोस्ती खतम. मग सांगा झाडे चांगली दोस्त ना... निःस्वार्थी, दोस्त. प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे महिन्याला एक झाड लावून त्याला जपावं. झाडाशी प्रेमाचं नात जोडावं...
आय लव यू ट्रीज...
प्रभावती संदिप वडवळे नांदेडकर