लग्न
लग्न
पहिलेपणाचे पडसाद ताजे असतानाच माझ लग्न झालं.. तसं ह्या लग्नाची नवलाई वगैरे वाटण्यासारखं काहीच नाही ..कारण आमच्या दोघांचंही हे दुसरं लग्न ...... पहिल्या लग्नाचा अनुभव हा काही फारसा चांगला नव्हताच... घरातल्यांची बघून दिलेलं..थाटामाटात सुयोग्य मुहूर्तावर देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने ....सर्व नातेवाईकांचे लाड पुरवून करून दिलेलं लग्न...तरीही मोडलंच .... दाखवायलाच फक्त एकत्र आणि आनंदी .......मनाचे बंध कधी जुळलेच नाहीत....कधीच आपुलकी वाटली नाही...ना त्याला ना मला...जनरीत म्हणून ३ वर्ष सांभाळलं.....मात्र नंतर नंतर असह्य व्हायला लागलं ...
वैतागलो...कंटाळलो....माणसं आधी मनानं लांब जातात....नंतर शरीरानं.......... शेवटी घेतला निर्णय ..झालो वेगळे.....कसलेही आरोप प्रत्यारोप नाहीत...एकमेकांवर चिखलफेक नाही ..शांतपणे वेगळे झालो.... मुलगा लहान असल्यामुळं तो माझ्याकडेच राहणार होता......त्याला घेऊन माहेरी आले ...कमावती होते कोणावर ओझं बनण्याचा प्रश्न नव्हता .........नोकरी चालू ठेवली ......नातेवाईक .. शेजारी पाजारी ...मित्रमैत्रिणी येऊन भेटत होते..सहानुभूती दाखवत होते ....पुढं काय केलं पाहिजे त्याचे सल्ले देत होते......मी हळू हळू त्यांना भेटणंच बंद केलं...माझ्याच जगात जगत होते ...
पंधरा दिवसातच भावाने स्थळ बघायला सुरुवात केली ...माझा कडाडून विरोध ..पहिल्या लग्नाचे पडसाद पुरे मिटलेसुद्धा नव्हते ...... लग्नाविषयी वाईट अनुभव असल्यामुळे लग्न करायचेच नव्हते मग मी विचार केला आता माहेरी पण राहायचा नाही मुलाला घेऊन एक जीवनाची नवीन सुरुवात करायची असा विचार करून घराबाहेर पडले. घराबाहेर पडल्यानंतर, नवीन जॉब पाहून एक नवीन भाड्याने घर घ्यायचं, काही दिवसांसाठी मैत्रिणीकडे राहिले मग भक्त नवीन जॉब नवीन घर घेऊन मुलाला सोबत घेऊन शांतीने राहू लागली पण समाजातील लोक एकट्या बाईला शांतीने थोडेच जगू देतात. तिचा नवीन आयुष्य नवीन संघर्ष चालू झाला संघर्ष करत करत ती तिच्या मुलाला लहानाचं मोठं करत होती मी.