कुरापती बालक
कुरापती बालक
एका परिवारात पति-पत्नि व त्यांचे दोन अपत्य होती. मोठी मुलगी आणि लहान मुलगा होता. वडिल सरकारी कर्मचारी व आई गृहणी होती. तो एका शहरात जिल्हा रुग्णालयाच्या जवळ असना-या वसाहतित राहत होता. जिल्हा रुग्णालयातील बहुतेक डॉक्टर हे त्याच कॉलोनीत राहत होते. त्यामुळे त्या कुंटुंबाची चांगली बरेच डॉकटरांन बरोबर ओळख झाली होती. त्यांचे दोन्ही बालक हे डॉकटरंच्या मुलांन सबोतच कॉवेंन्ट मधे शिकायला जात होते.शाळा सुटल्यानंतर बहुतेकंच्या मातोश्री त्यांच्या बालकांना आण्यासाठी जात होत्या. त्यामुळे त्या बालकांच्या मातोश्रींची एका-मेका सोबत घनिष्ट मैत्री झाली होती. त्यांच्यात पारिवारीक मित्रता पण होती.
त्यांचे दोन्ही बालक हे शिक्षणात चांगलेच होते. तेवढेच ते खेळण्यात पण प्रविण होते. सर्व कॉलोनीतील बालके त्यांच्या फालतु वेळात एकत्र खेळत होती. पण त्यांच्या मुलाला एक फार गुणी सवय होती. त्याच्या जवळ असणा-या सर्वच खेळवण्यांचा तो विच्छेदन करुन विलेवाट लावत होता. हा त्याचा अत्यंत चांगला छंद होता. या त्याच्या छंदामुळे त्याची, आपल्या ताई व आई सोबत नेहमीच चकमक होत होती. पण त्याचे वडिल त्याला काही कधी रागवत नव्हते. त्यामुळे तो आपला छंद काही केल्या सोडत नव्हता. उलट खेळवणे कसे तोडले आणी त्यात काय काय भाग होते व ते एकत्र कसे काम करत होते याची महिती तो वडिलंना देत होता. जे आड्यात असते तेच पो-ह्यात उतरत असते. त्याच्या वडिलांना विश्वास झाला होता की मुलगा मोठे पणी नकिक्च अभियंता होणार !. रिकामे डोक म्हणजे शैतानच घरकुल. त्यामुळे ते मुलाला रागवत नव्हते पण अनावश्यक प्रोत्साहन पन देत नव्हते.
शहरात काही सणा निमित्य मेला लागला होता. संपूर्ण परिवार तो मेला बघण्यासाठी गेले असतांना त्यांच्या अपत्यांने काही खेळणे विकत घेतले होती. त्या खेळण्या मधे एक मोठी सुंदर बाहुली पण होती. तीला दाबले की ती शिष्टि वाजवत होती. शिष्टिचा आवाज कशामुळे येतो हे जानण्याची उत्सुकता त्याला सतत जानवत होती. नेहमीच्या सवई प्रमाने त्याने विकत घेतलेली बाहुलीचे निसनतान करण्याचे महाण कार्य केले होते. नंतर त्याला उलघडा झाला की याच्या मधे एक शिष्टि बसवली आहे. ती त्याने बाहेर काढली होती. व ती तो वाजवत होता.
नेहमी प्रमाने त्याच्या मातोश्री सोबत तो शाळेतुन आला होता. शाळेचा पोषाक न बदलवता व जेवन न करता आपाला ताई व आई समोर सारखी शिष्टि वाजवत होता. आणि त्यात तो मग्न झाला होता. त्याच्या आईला फार संताप आला होता. एक तर त्याने बाहुलीचे निसनतान केले होते. आणा जेवन पन करुण नव्हता राहिला होता. तीने रागाच्या भरात त्याचा एक हात पकडला व दुस-या हाताने त्याच्या पाठिवर जो-याने एक मुक्का लावला होता. हे सगळं घडतांना शिष्टिचा आवाज बंद झला होता. तीने त्याला विचारले शिष्टि कुठे आहे,तेव्हा त्याने निरागस पने सांगितले की शिष्टि आत पोटात गेली. पण तीला ते खरे वाटले नव्हते. तेव्हा तीने शिष्टि सर्वत्र तपासली होती. पन तीला शिष्टि मिळाली नाही. करु गेले कायं आणी वरती झाले पायं अशी तीची दशा झाली होती. आता तिचि पंढरी घाबरली होती. तीने आपल्या पतिला घरी बोलावले व घडलेला प्रकार सविस्तर सांगितला होता. आता तीच्या डोक्यात नाना प्रकारच्या विचारांची गोंधळ उडाला होता. आलाले भोगासी असावे सादर .मुलाचे वडिल मुलाला घेवुन दवाखाण्यात गेले होते. मुख्य दारातुन प्रवेश करताच तीथेच एक परिचित डॉक्टर मिळाले होते. त्यांचा मुलगा पण त्या मुलाचाच वर्गमित्र होता. तेव्हा मुलाच्या वडिलांनी घडलेली रामायण डॉकटरांना सांगितले होते.डॉकटरांनी लगचे रुग्णाची तपसनी केली होती. सर्व काही ठिक-ठाक कार्य करित होते. मुलगा एकदम मस्त व तनावमुक्त होता.त्यामुळे डॉकटर म्हणाले घाबरण्याचे काही कारण नाही. त्यांनी तोंडा पासुन तर संपूर्ण पचन संस्थाचा एक्स-रे काढण्यासाठी सांगितले होते. एक्स-रे चे परिक्षण व निदान केल्या नंतर डोकटरांना कुठेही शिष्टि आढळली नाही.तेव्हा वडिलांचा जीवात जीव आला होता. तरी डॉकटारांनी सांगितले की मुलाला शक्य तीतकी केळी खावु घाला. त्या दिवशी आम्ही त्याला नुसती कंटाला येई पर्यंत केळी खावु घातली होती.
त्या रात्री पति-पत्नि ला झोप लागली नव्हती. त्यांच्या डोक्यात वेग-वेगळे असंख्य भितिदायक विचार घोळत होते.शेवटी ती कठिन,तनाव्युक्त रात्र उलटली होती. मुलगा अत्यंत निरागस पणे झोपला होता.त्याला शाळेसाठी उठवण्यात आले होते. शेवटी त्याच्या आईने त्याला एक -समान जागेवर संडास करण्यास सांगितले होते. तीने त्या संडासची तपसनी केली होती. त्यात तीला ती शिष्टि सापडली होती. तेव्हा तीने एक लांब श्र्वास घेतला होता. चेह-या वरिल संकटच्या रेषा मंदावल्या आणी आनंदाने हस-या चेहरा घेवुन तीने आपल्या पतिला ही बातमी दिली होती. दोघेही आता चिंतामुक्त झाले होते.वडिला मुलांना शाळेत घेवुन गेले होते. आता त्यांची रोजची दिनचर्या सुरु झाली होती.