चिंतन..!
चिंतन..!
दोन हजार बावीसच्या अखेर पर्यंत उपदेश नको या वाक्यांनी संवादाची सुरुवात व्हायची आणि आपण मोठे आहोत असे उगाचच वाटायचे.काल वर्षाअखेरीस संकल्प केला आणि उपदेश बंद म्हणून कुलूप लावले.खूप बरे वाटले पण प्रश्न मनात रुंजी घालू लागला ,खरोखरच मुले मोठी होतात काय हो?आणि सकाळी सावली पाहून पटले.प्रत्येक गोष्टीची जसजसा सूर्य माथ्यावर येतो, प्रकाश पडतो तसतशी प्रत्येक गोष्टीची वाढ होते.हे उमजताच संकल्प तडीस गेला...आणि खात्री पटली. मुले मोठी होतात,रुजतात आणि फुलतात..!
सर्व वाढीस लागलेल्या ऋणानुबंधाना मनःपूर्वक अनेक शुभेच्छा..!बदलाचा मनस्वी स्वीकार हीच प्रगती...!