अलक (अति लघुत्तम कथा)
अलक (अति लघुत्तम कथा)
सकाळी उठलो ,उठल्यानंतर नित्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली पण अचानक आठवणींचे वादळ मनात आले.आणि नको त्या गोष्टी मनात रुंजी घालायला लागल्या.
मृत्यूनंतर माणसे स्मृती मागे ठेवून जातात. स्मृती, संस्कार मागे ठेवून जाते .संस्कार, आचार मागे ठेवते. आपले प्रत्येकाचे वागणे त्याप्रमाणे ठरते.
चांगल्या, सुंदर ,प्रसिद्ध व्यक्तीचा मेंदू मिळाला तर जगण्याला काय बहार येईल. अवयवांचं प्रत्यारोपण होतं,पण मेंदूचं प्रत्यारोपण झालं तर ?पुन्हा शेक्सपियर , पु.ल.,कुमार गंधर्व येतील.पण हिटलर, नाझी,ही येतील. त्याचं काय करायचं.?
भानावर आलो आणि आंघोळीला जायचं हे लक्षात आले.