त्रिशंखु अवस्था
त्रिशंखु अवस्था
त्रिशंखु अवस्था...अर्थात जीवनातील सहज घडणाऱ्या कारणीभूत चुका......! ज्या माणसाला जीवन कसे जगायचं ते शिकवतात. कलीयुगात सज्जन माणूस प्रवाहपतित होतो...आणि समाज जडण घडणीचा एक भाग होतो कारण जगणे हा एकच हेतू त्याला मोलाचा वाटतो.!
अनुभवाच्या शिदोरीतून
आज मी तीनही गुण
बाजूला काढले
ज्यांनी आजवर
मला काहीच
नाही दिले
मुक्त जीवन जगण्यासाठी
मी आज एक
पुढे पाऊल टाकले
सहज विश्वास
टाकणे आता
मी सोडून दिले
दुसऱ्याचा
विचार करणे
मी आता बंद केले
सर्वांकडून आजवर
फसगत होता
माझे डोळे उघडले
चोरांची फौज पाहून
चोर नसेना ,चोरांची लंगोटी
खेचणे क्रम प्राप्त झाले
भाग्य माझे असे
सारे विळखा
घालून पुढे उभे
तरीही मी
स्थितप्रज्ञ इथे
अचल स्थानबद्ध असे
आता भाग्यच माझे
शोध घेईल माझा
देण्या प्रसाद मज ताजा
भाग्यावरचा हक्क माझा
कोणीही हिरावणार नाही
पदरी सारे पडल्याविना राहणार नाही
जे माझे ते मलाच मिळणार
भाग्य आता माझे खुलणार
मी खरेच आता भाग्यवंत होणार...!
मी खरेच आता भाग्यवंत होणार...!