राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
ओळखतात यांना सकलजन,
भजन आणि किर्तनातून घडवले,
घडवले जातीभेद,अंधश्रद्धा निर्मूलन.
केली गुरुकुंज आश्रमाची स्थापना,
प्रबोधनाचे वैशिष्ट्य खंजिरी भजन,
देशभरात हिंडुन केले अध्यात्मिक,
सामाजिक व राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रबोधन.
ग्रामोन्नती व ग्रामकल्याण घडवण्याचा,
केन्द्रबिंदू जणू त्यांच्या विचारसरणीचा,
केला मूलभूत विचार महाराजांनी,
ग्रामविकासाच्या विविध समस्याचा.
व्यसनधिनतेचा केला तीव्र निषेध,
ऐहिक व पारलौकिकतेचा समन्वय साधला,
स्त्री ला अज्ञान,दास्यात ठेवणं अन्यायकारक आहे
हे पटवून देऊन,
समुदायिक,सर्वधर्मिय प्रार्थनेचा पुरस्कार केला.
ग्रामगीता लेखन ही जणू
महाराजांच्या वाड:मय सेवेची पूर्ती,
राष्ट्रपती भवनात गायले खंजिरी भजन,
या भजनाने मिळाली राष्ट्रसंत म्हणून कीर्ती.