पूर
पूर
वादळ वाऱ्याच्या सोबतीने त्याने
त्याचे रौद्र रूप दाखविले
सरींचा अविरत वर्षाव करून
सर्वत्र पूराने हाहाकार माजवले
पै पै जमून उभारलेला संसार
आज पाण्याखाली गेला
कोसळणारा पाऊस एवढा
क्रूर कसा झाला?
पूरामुळे सर्व जीवनाची झाली दैना
कोप म्हणावा निसर्गाचा की चूक माणसाची
अश्रूंचा पूर काही केल्या ओसरेना
ग्रहण म्हणावे की तरंग क्लेषाचे
का मागे माणसाच्या मरण हे लागले स्वस्ताचे
किती हा पूर, तसा अंतरी काहूर
होत नव्हत सार गेल, शोधू तरी आता किती दूर?
सुंदर अश्या या सृष्टीला दृष्ट लागली का कुणाची?
बिघडला निसर्गाचा समतोल
हुशारी म्हणावी लागेल का ही माणसाची..