पाखरू...
पाखरू...
दाटीवाटीच्या रानात
ऐकले गं पाखरू..
म्हणे, अबोल या जगात
कसे मी वावरू ?
अडखळणाऱ्या संवादास
लागली की ग्रहण..
विखुरलेल्या जाणिवांची
चिन्ह कशी सावरू ?
भोळा समज त्याचा
म्हणे, हक्काचेच जग..
ऐनवेळी साथ धूसर
ही मन कशी पारखू?
प्राणपणाने तो वेडा
शोधू लागला ओलावा..
इवल्याश्या मनात
किती क्षण साठवू ?
थकला शेवटी जीव
शोधत कस्तुरी दर्प.. !!
आता सांधतो स्वतःस
वेचत संवाद हर्ष.... !!