माणसांची ओळख झाली
माणसांची ओळख झाली
जेव्हा जेव्हा संकटे आली
साथ कोणी नाही दिली,
जवळ होते जे फार माझ्या
ते तेव्हा च दूर झाली.
संकटे येतात जीवनात का
ते कळले खरे आज मला,
संकटांनी च माणसाची
खरी ओळख करून दिली.
जेव्हा असतं मजेत आपलं
तेव्हा सारेच आपले असतात,
कळेना आज त्यांनीच का
अशी पाठ फिरवली..?
सोबत नाचणारे , पार्ट्या खाणारे
गेले कुठे आता दूर ते सारे ?
सर्वांनाच कशी आज माझी
ओळखच विसरून गेली.?
जशी काळ, वेळ
तशी वागतात माणसं
या कठीण प्रसंगी मला
ओळख माणसांची झाली.
पसरु नये कधीच
कुणा पुढे ही हात,
या काळाने मला आज
शिकवण खरी ही दिली.
कोणी कुणाचं नसतं
आहे स्वार्थ माणसाचा,
जे संकटात साथ देती
तीच माणसं आपली...
आता मला कळाले
कोण आहे कुणाचे ,
खरी ओळख माणसांची
मज संकटातचं झाली...
विसरु शकत नाही
मी त्यांचे आशीर्वाद,
माझ्यासाठी ज्यांची
प्राणज्योत मालवली...