माई
माई
लेकरांना वाऱ्यावरती
माई गेली तू सोडूनी
कोण होणार कैवारी
विचारती कर जोडूनी
स्मशानात भाजली भाकरी
नाही कुणी तुला सोबती
पोटच्या चिमुकलीला
अर्पुणी देवासाठी
सांभाळले अनाथांना
उभी माय त्यांच्या पाठी
भाषण नाही तर राशन नाही
दिली ओळख अशी स्वतःची
जीवनात किती संघर्ष
तरी ठाम तु आपल्या मताशी
अनाथांच्या हाती असतो झाडू
माऊलीने मात्र दिले हाती खडू
आज उभे सामर्थ्यात झाड
आठवून येते किती रडू
होती किती कनवाळे
जशी दुधावरची साय
कुठे हरवली पहा
माझ्या अनाथांची माय
मरण म्हणजे काय
शेवटी देह जातो जळून
दिव्य वारसा माणुसकीचा
जगाला दिला दाखवून