जिंदगी उधार झाली
जिंदगी उधार झाली
जिंदगी उधार झाली
सारी हयात गेल्यावर
गाव कोणत माझ
जवळ आलो मेल्यावर
दुःख पेरले होते मनावर
सरकार पाणी घालत
होत त्या रानावर
उघडले डोळे सगळ्यांचे
जेव्हा चढलो फासावर
सुखी आयुष्याला गहाण
ठेवले मी कर्जावर
पै पै फेडुन ही कमी
ना आली व्यजावर
आसवांच घर केले होते
सारा दोष होता नशिबावर
कोण होते पांढरे बगळे
आता विश्वास ठेवू कोणावर