अभिमान ....
अभिमान ....
सकाळची ती वेळ ...
शाळेच्या पटांगणावर चाले होते खेळ ...
शाळा भरली होती विध्यार्थीनी ....
आणी त्याच्या किलबल आवाजांनी ...
असाच एका वर्गात किलबिल चालू होता ...चाहूल लागताच बाईचा तो शांत झाला होता ....
आज ठरवलं बाईंनी नवीन काहीतरी शिकवावं ....
विचारलं प्रश्न प्रत्येकाने उठून आपल्या वडिलाच्या नोकरी किंवा व्यवसायाबद्ल सांगावं ...
प्रत्येक जण उठला आणि सांगू लागला ....
वर्गामधला तो विध्यार्थी मात्र हिरमुसलेला ...
कारण ...सगळ्याचे वडील होते मोठे कोणीतरी ...
हाच्या बाप होता साधा शेतकरी....
आपले वडील नोकरी करतात असे सांगावे ठरवले त्याने मनी .....
आपला कर्मांक येताच पटकन सांगून बसला तो बाकावर त्या वेळी ...
घंटा वाजली तास संपला ...
दुसऱ्या तासाला सुरवात झाली ...
मराठीचा तो तास होता ...
बाईंना नवीन कविता शिकवायची होती ...बाईंनी सुरवात गेली...
आणि पहिली शेतकऱ्याची महती सांगितली ...
निळ्या आभाळाच्या खाली करतो तो काम ...
उन्हात राबून निघतो त्याचा घाम ...
मेहनत पैसे भविष्यासाठी सगळे पणाला लावतो...
पावसाच्या पुराने पीक वाहून गेल्यावर मात्र तो कोलमडतो ...
तरीही नव्या जोमाने परत तो उभा राहतो ...
भविष्यासाठी परत तो राबतो ...
हे ऐकुन त्या मुलाचे डोळे डबडबडले ...
आपण केलेल्या चुकीचे त्याला वाईट वाटले...
शाळा सुटताच तो पळत गेला घरी ...
त्या वेळी त्याचा बाप आला होता शेतावरून घरी ...
बापाला त्याने घट्ट मिठी मारली ...
आणि डोळ्यातल्या आसवानी आपली धार सोडली ...
रडत रडत एकच वाक्य म्हणाला ....
"आहे मला अभिमान भारी...
कारण आहे बाप माझा शेतकरी ...."