हृदयाला "भाव " तोवर, जोवर "भाव " त्यात आहे
अन्यथा हृदय फुकाचे, पतंगीचा ताव आहे
समाधान हे सगळ्या व्याधीवर चालणारे आरोग्याचे जादुई औषध आहे.
समाधान हे सगळ्या व्याधीवर चालणारे आरोग्याचे जादुई औषध आहे.
पुस्तकाच्या पानांत प्रचंड ताकद आहे.ती वादळात वेगाने उडते तर कधी वादळही घेऊन येते. म्हणून साहित्य हे क्रांतीच दालन आणि नाशाचा सुप्त ज्वालामुखी आहे असे म्हणतात.
वक्तव्याच्या सारात बोलणाऱ्याचा दृष्टीकोन लपला असतो.तो सार्थ की अनर्थ हे ज्याला कळते, तो खरा श्रोता.
राग अनावर होतो हे खरे आहे.परंतू रागावर आवर घालता येते हे अनादी सत्य आहे.
अनुसरता चांगले ,मार्गे जाई नीट
लोचनाशी नाद न लागे मग वाईट सवयींचा
भीती अंधाराची नाही तर अनेक रुपात अंधारात वावरणाऱ्या श्वापदांची असते. आपण मात्र शरीराचा सवंगडी असणाऱ्या अंधाराला शत्रू समजतो. तिमीर बिचारा निद्रेचा स्वानंद वाटत सदैव निवांत राहतो.
अपयश दिव्य संजीवनी बुटी आहे. फक्त ते स्विकारण्याची मनाची तयारी हवी. मग सार काही अशक्य शक्य होते.